इतिहास

🌿सस्नेह जय जिजाऊ
आज सयाजीराव गायकवाड ७७ वा स्मृतिदिन
जन्म - ११ मार्च, १८६३ निर्वाण - ६ फेब्रुवारी १९३९
थोर मानवतावादी , बुद्धप्रेमी महान राजे सयाजीराव गायकवाड यांच्या ७७ व्या स्मृतिदिना निमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन, मानाचा मुजरा !!!

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी गौरवाची बाब म्हणजे रहिमतपूर, तालुका कोरेगाव,जिल्हा सातारा येथे जन्म झालेल्या सरदार माने यांची कन्या जमनाबाई यांचा विवाह बडोद्याचे राजे खंडेराव गायकवाड यांच्याशी झाला. त्यांना मुलबाळ नसल्याने जमनाबाईंनीच नाशिक  जिल्ह्यातील कवळाणे  येथील गोपाळ काशीराम गायकवाड याचे गुण हेरले व हाच गोपाळ पुढे सयाजीराव गायकवाड म्हणून बडोदा संस्थानचे राजे झाले. म्हणजे सयाजीराव गायकवाड यांची दत्तक आई जमनाबाई या महाराष्ट्रकन्या असल्याने महाराष्ट्रासाठी ही फार मोठी गौरवाची बाब आहे.
काळाच्या पुढे पाहणारा, आपल्या राज्यात कायद्याने मोफत शिक्षण देणारा, अस्पृश्य-आदिवासींच्या शाळा काढणारा, गाव तिथे वाचनालय उभारणारा, बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह अशा सुधारणा घडवून आणणारा हा बडोद्याचा राजा महाराष्ट्रातील मराठीजनांसाठी मात्र अजूनही आपलासा वाटलेला नाही. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने त्यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्याचे ठरवले होते, परंतु नंतर तो प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. कारण तोवर बडोदा गुजरात राज्यात समाविष्ट झाला आणि आपण प्रांतवादाच्या भींतीने अलग झालो. त्यांच्याबद्दल जे लिखाण आहे ते एकतर त्यांची स्तुती करणारे किंवा त्यांच्यावर टीका करणारे आहे. त्यामुळे महाराजांचे तटस्थ आणि समग्र व्यक्तीमत्त्व मराठीत अभावानेच आहे.
त्यामुळे महाराजांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना, यशांना आणि वैयक्तिक दुःखांना स्थान मिळावे म्हणून बाबा भांड यांनी तीन-चार वर्षांपासून या कादंबरीसाठी स्वतःला झोकून घेतले होते. या वर्षात महाराजांवर अजून तीन पुस्तके काढण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यातील एक त्यांचे चरीत्र असेल, दुसरे त्यांच्या भाषणांचा खंड आहे. यात त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, साहित्य व संस्कृतीविषयक विचार आहेत, तर तिसरे त्यांच्या हुजूरनाम्यांवर आधारित असेल.
मराठी लोकांत ज्या महाराजा सयाजीरावांबद्दल अनास्था आहे.
त्यांच्याविषयी गुजरात-बडोद्यात मात्र कमालीचा आदरभाव भाव आहे. या शासनकर्त्याची राज्यशकट हाकण्याची जी हातोटी होती त्याने अनेक भारतीय नेतेही प्रभावित झाले आहेत. म्हणूनच त्यांच्ये महाराजांचे शासनविषयक धोरणाचे जे पुस्तक आहे, त्याचे पुनर्मुद्रण करून आपल्या राज्यातील प्रशासकांना आणि कार्यकर्त्यांना वाटले आहे.
स्वामी विवेकानंद हे पहिल्या विश्व सर्वधर्म परिषदेला उपस्थित होते, हे सर्वांना माहीत आहे पण महाराजा सयाजीराव गायकवाड हे दुसर्या विश्व सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष होते,हे मात्र कित्येकांना माहीत नाही. त्यांनी जागतिक मानववंश परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही केला होता. परंतु त्यातून ते सहिसलामत सुटले होते. अशा कितीतरी नोंदी आणि बाबी मराठी लोकांपुढे आलेल्या नाहीत. वस्तुतः हे काम यापूर्वीच कुणीतरी करायला हवे होते.
अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेला गोपाळ पुढे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक म्हणून गेला आणि बडोद्याच्या राजगादीवर एक महाराजा म्हणून सिहासनावर आरूढ होतो . नुसता आरूढ झाला नाही तर हिदुस्थानातील एकमेव आदर्श राजा हा किताबही पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडून त्यांनी मिळवला.
सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात आणल्या.
या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून खूपच प्रयत्न केले. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा आपल्या संस्थानात करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले.अत्यंत पुरोगामी विचाराच्या या महाराजाने राष्ट्रीय, सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. १८८६ मध्ये मुंबई येथील एका समारंभात उत्स्फूर्तपणे त्यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. तसेच डॉ.आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली होती.
 अशा या आदर्श राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.
            विनम्र अभिवादन
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

No comments:

Post a Comment